महिला व बालकल्याण विभाग

महिला व बाल कल्याण समिती सभा दिनांक 22 एप्रिल 2013 मधील विषय क्र.96 ठराव क्रं.82 चा कारणा पुरता उतारा

विषय क्रं.96 :- महिला व बाल कल्याण समिती मार्फत सन 2013-14 मध्ये राबविणेचे योजनांचे अटी व शर्ती निश्चित करणे.

ठराव क्रं.82 :- महिला व बाल कल्याण समिती मार्फत सन 2013-14 मध्ये राबविणेचे योजनां बाबत समिती सभेत चर्चा होवून खालील प्रमाणे अटी व शर्ती निश्चित करणेंत येत आहेत.

महिला व बालकांच्या विकासासाठी विविध योजना महिला व बाल कल्याण समिती मार्फत राबविणेत येतात. शासन निर्णय 10 मार्च 2011 अन्वये काही योजनांत वाढ झालेने, तसेच काही योजनांचा नव्याने समावेश प्रस्तावित असलेने, या साठीचे वैयक्तिक व इतर योजनांचे अटी व शर्ती निश्चित करणे साठी खालील प्रमाणे अटी व शर्ती प्रस्तावित करणेंत येत आहेत.
पंचायत समिती स्तर, बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला बचत गट यांचे माध्यमातून योजनेचा प्रसार करुन कागदपत्र पूर्तता करुन घेणेंचे प्रस्तावित आहे. अनू. जाती/ जमाती या सह सर्व स्तरातील महिलांंसाठी महिला व बाल कल्याण विभागाकडील योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. अंदाजपत्रकात करणेंत आलेल्या तरतूदी नुसार घ्यावयाच्या योजना व त्यांचे अटी व शर्ती खालील प्रमाणे राहतील.

केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना

बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अंत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. या धोरणनुसारच 2 ऑक्टोंबर 1975 साली प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुलांचे सर्वांगीण विकासासाठी म्हणून आरोग्य, आहार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. गरीब कुंटूंबातील महिला आणि मुले यांच्यासाठीचा आणि तळागाळपर्यंत पोहचलेला राज्यभरात 88,272 अंगणवाडी केंद्गे असणाराव ग्रामीण भागात 364 प्रकल्प, 85 आदिवसी प्रकल्प व 104 शहरी प्रकल्प असणारा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाखली 1) पूरक पोषण आहार, 2) लसीकरण 3)आरोग्य तपासणी 4)संदर्भ आरोग्य सेवा, 5) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण 6) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण इ. सहा महत्वाच्या सेवा दिल्या जातात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना हि केंद्ग शासन पुरस्कृत योजना असून या योजनेची सुरूवात अमरावती जिल्हयातील धारणी या आदिवसी व धारावी , मुंबई या नागरी प्रकल्पाच्या स्थापने पासून महाराष्ट्र राज्यात झाली. टप्प्याटप्याने योजनेच्या प्रकलप संख्येत वाढ होऊ न राज्यातील विविध नागरी , ग्रामीण व आदिवसी प्रकल्पातून योजनेचे प्रकल्प स्थापनेत आले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कशासाठी ?

  1. देशाच्या मानवी साधनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी. कोवळ्या बालवयातच, मुलांच्या शरीराच्या, मनाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या विकासाचा

  2. भरभक्कम पाया घालण्यासाठी. बालमृत्यू, शारीरीक अपंगत्व, कुपोषण, शाळाशिक्षणात प्रगति असूनही शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची परिस्थीती आणि विकसनक्षमतेची प्रतिकूलता यांच्यामुळे उद्‌भवणारा अपव्यय

  3. टाळण्यासाठी, आणि बाल विकासाव्या क्षेत्रामध्ये जनतेचा सामूहिक सहभाग लाभावा आणि बाल विकासाच्या कार्यक्रमाला स्वयंपूर्णता प्राप्त व्हावी यादृष्टीने चालना देण्यासाठी.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश :-

  1. 0 ते 6 वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
  2. मुलांचा योग्य मानसिक, शाररीक व सामाजिक विकासाचा पाया घालणे
  3. बालमृत्यूचे, बालरोगाचे, कुपोषणाचे व मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.

  4. बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभांगांमध्ये धोरण व अंमलबजावणी
  5. याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
  6. योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्याबाबत मातांची क्षमता वाढविणे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्याती एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी केंद्ग/ प्रकल्प कार्यन्वीत करणेसाठी आवश्यक लोकसंख्येबाबतचे निकष

पूरक पोषण आहार

अंगणवाडी केंद्गस्तरावर पूरक पोषण आहार पुरविणेत येत असलेने ग्रामीण क्षेत्रातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मुलांच्या शाररीक व बौध्दिक विकास करणे व आजाराचे प्रमाण कमी करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे, माता व महिलांना आहार व आरोग्य संबधिचे शिक्षण देणे इ. उद्दिष्टे साध्य होतात. 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराव्दारे दोन वेळेस 500 कि.ग्रॅ्‌.उष्मांक आणि 12 ते 15 ग्रॅम प्रथिनेयुकत आहार स्थानिक महिला बचत गटांमार्फत मुलांना देण्यात येतो. या आहारामध्ये सकाळचा गरम नाष्टा (शेंगदाना लाडू, चिक्की, शिरा इ.) व दुपारी पूरक पोषण आहार (लापशी, उसळ, खिचडी) इ. समावेश आहे. घरी घेऊन जाण्यासाठी आहार पुरवठा. (- ) राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्र. एबावि 2008/प्र.क्र.-59/का-5 दिनांक 24/08/2009 नुसार सुधारित आर्थिक निकष व सुधारित प्रमाणकानुसार 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थी, 6 महिने ते 6 वर्ष तीव्र कमी वजनाची बालके, गरोदर व स्तनदा माता यांनी घरी घेऊन जाण्यासाठी आहार पुरवठा करणेत येत आहे. स्वरुपातील अन्न हे विशेष पध्दतीने तयार केलेले असुन सुक्ष्म पोषक तत्वांनी युक्त अशा पद्‌ध्तीने समृध्द केलेले तसेच स्वच्छतापूर्ण वातावरणात तयार केलेले व उष्मांकयुक्त ( ) आहे. सर्व पाककृतींसाठी लाभार्थी प्रकारानुसार 25 दिवसांची (एक महिना) पॅकींग साईज, प्रति दिन प्रति लाभार्थी सर्व्हीग साईज, प्रति दिन प्रति लाभार्थी देय आर्थिक निकष, हे केंद्ग व राज्य शासनाने निश्चित केले आहेत. प्रति दिन प्रति लाभार्थ्यास द्यावयाच्या शिरा, उपमा, सत्तु व सुखडी या आहाराचे प्रमाणानुसार 25 दिवसांसाठीच्या आहाराचे पाकीटे तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रति लाभार्थीस देय असलेल्या 25 दिवसांसाठीच्या प्रमाणकानुसार खालील कोष्टकाप्रमाणे लाभार्थीना आहाराचे पाकीटे देण्यात येतात.

लसीकरण

बालकांचे आरोग्य व पोषण यांचा धनिष्ठ संबंध आहे. बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून त्यांचे आरोगय चांगले ठेवणेचे दृष्टीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांचे समन्वयाने 6 वर्षाखालील सर्व बालकांना वयानुसार सहा बालरोगांपासून संरक्षण करण्यासाठी डांग्या खोकला, घटसर्प, क्षयरोग, पोलिओ, गोवर लसी देण्यात येतात. तसेच गरोदर स्ञियांना धनुर्वातापासुन संरक्षण करण्यासाठी धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात येते.

3) आरोग्य तपासणी अंगणवाडी कार्यक्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरी तसेच 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून किमान 4 वेळा आरोग्य विभागाकडून केली जाते. अंगणवाडीमार्फत 100्‌% लाभार्थीची आरोग्य तपासणी होणेसाठी पाठपुरावा करणेत येतो. प्रत्येक अंगणवाडी केंद्गामार्फत प्राप्त मेडिकल किटमधून लाभार्थींस प्राथमिक औषोधोपचार केले जातात.

4) संदर्भ आरोग्य सेवा ग्रामीण भागातील लाभर्थींची आरोग्य तपासणी झाल्यानंतर गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास अशा महिला व बालकांना सविस्तर सेवेकरिता ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तथापि अंगणवाडी केंद्गामार्फत संदर्भ सेवा देणेत येते. रुग्ण, बालके/ महिलांना संदर्भ सेवेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्ग/ ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात येते. ज्यांचे पालक औषधे खरेदी करण्याकरिता पैसे नसल्याने उपचार घेण्याचे टाळतात, अशा करीता प्राथमिक आरोग्य केंद्गातून औषधी पुरविण्यास निधी उभारणे तसेच ग्रामस्थांकडुन मदत घेऊन औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडीमार्फत प्रयत्न करणेत येतात.

5) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण

15 ते 45 वर्षे वयोगटातील स्त्रिया, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना बालकांचा विकास साधण्याचे दृष्टीने पोषण आहार व आरोग्य विषयक शिक्षण दिले जाते. यासाठी आंगणवाडी स्तरावर नियमितपणे गृहभेटी देऊन तसेच महिला मंडळांच्या सभा/ स्वयंसहाय्यता गटाच्या सभा, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांच्या तपासणीचे वेळी उपकेंद्गामध्ये, बालकांची वजने घेण्याचे दिवशी, लसीकरणाच्या दिवशी, उत्सव, जत्रा, आठवडा बाजार यावेळी माता बाल संगोपन, सकस आहार प्रात्यक्षिके, वैयक्तिक स्व्च्छता, परिसर स्वच्छता इत्यादी विषयांवर माहिती दिली जाते. 6) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण 3 ते 6 वर्षातील बालकांचा बौद्धीक, सामाजिक, भावनिक, व शारीरीक कौशल्येही विकसित होणे आवश्यक आहे. मुलांना शाळेची ओळख व गोडी निर्माण करण्याचे दृष्टिने लहान मुलांना शाळापूर्व शिक्षण औपचारिक पद्‌ध्तीने न देता अनौपचारीक पद्धतीने देण्यात येते. निसर्गातील पाने, झाडे, फळे, फुले व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आनंददायी शिक्षण देणेत येते.

वध्दीसंनियंत्रण

जन्मल्यापासुन बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौध्दीक विकास झपाटयाने व एका विशिष्ठ क्रमाने होत असतो. बालकांचे वजन व उंचीत होणारी वाढ ही देखील एका ठराविक प्रमाणात असते. जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या बालकांच्या वाढीचे नवीन मापदंड सन 2006 नुसार बालकांच्या वृध्दीचे संनियंत्रण वृध्दी आलेखाच्या सहाय्याने वयानुसार वजन यानिर्देशांकाद्वारे केले जाते. योजनेद्वारे अगंवाडीस्तरावर दरमहा 10 ते 15 तारखे दरम्यान मुलांचे व मुलींचे वृध्दीपत्रक वेगवेगळे करुन बालकांचे वजन घेऊन त्याची नोंद वृध्दी पत्रकात घेतली जाते. बालकाच्या वाढीच्या टप्प्यात अडथळा येत असेल तर सहज लक्षात येऊन वेळेवर योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेता येते. अति तीव्र कमी वजनाची बालके अति धोकादायक असल्यामुळे ताबडतोब वैद्यकीय उपचार व संदर्भ सेवा देण्यात येते. बालकांचे वजन घटण्यास व वाढ न होण्यास कारणभूत असणा-या अनेक कारणांची , आजारांची माहिती शोधून (उदा.डायरिया,श्वसन,जंतुसंसर्ग ,अपुरा आहार,आईचे आजारपण इ.) त्यानुसार वेळेवर सुधारात्मक उपचार करणे सहज शक्य होते. बालकांना दयावयाचा पुरेसा आहार, आरोग्याची काळजी तसेच त्यांच्या वृध्दी व विकासासंबंधी मातांचे व कुटुंबातील सदस्यांचे समुदेशन करणे या गोष्टी प्रभावीपणे करणेस मदत होते.

नाविन्यपूर्ण उपक्रम -- ग्राम बाल विकास केंद्ग (ॄ) कुपोषणाच्या समस्येवर मात करणेसाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. पुरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येतो. कुपोषण निर्मूलन व बालमृत्यू कमी करण्यासाठी 'ग्राम बाल विकास केंद्ग'योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. महिला बाल विकास अंतर्गत 'एकात्मिक बाल विकास सेवा योजना 'आणि सार्वजनिक विभागाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांचे समन्वयाने ग्राम बाल विकास केंद्गामार्फत 6 वर्षाखालील तीव्र कुपोषित () व मध्यम कुपोषित (ं) बालकांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यात येते . ग्राम बाल विकास केंद्गामध्ये गावातील 6 महि­ने ते 6 वर्षे वयोगटातील कुपोषित बालकां­ना दाखल करणेत येत आहे. एक महि­न्याच्या कालावधीमध्ये सदर बालकान­ा गांव पातळीवरील ग्राम बाल विकासे केंद्गातील आहार संहितेचा वापर करु­न त्या बालकांच्या श्रेणीत सुधार करणेचे प्रयत्न करणेत येत आहेत. बालकान­ा दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केंद्गात दाखल करणेत येऊन पोषणाबाबत काळजी घेतली जाते. बालकांना दररोज नियमितपणे आहार व औषधे देणेत येतात. ग्राम बाल विकास केंद्गामुळे पालकाची दवाखा­न्यात ये-जा करण्याची अडचण दुर होते, मातांना आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन मिळते तसेच गावातील इतर ग्रामस्थ दिल्या जाणा-या आहाराची माहिती घेवू­न सक्षम होणेस मदत होते. या केंद्गांना संबंधीत गावांतील ग्राम पंचायती व ग्रामस्थांचेही चांगल्याप्रकारे सहकार्य मिळत आहे. ग्राम बाल विकास केंद्गाचा प्रति बालक प्रतिदिन खर्च रु .32/- शासनाने निर्धारित केलेला असुन केंद्गाची किरकोळ डागडुजी , सुशोभीकरण , बाळकोपरा इ. एका वेळचा रु. 400/- खर्च करणेस परवानगी देणेत आलेली आहे. सदरच्या केंद्गास संबंधीत गावांतील ग्राम पंचायती व ग्रामस्थांचेही चांगल्याप्रकारे सहकार्य मिळत आहे तसेच काही ठिकाणी पूर्णतः लोकसहभागातू­ा ग्राम बाल विकास केंद्गे यशस्वीपणे राबविणेत आलेली आहेत. जिल्ह्यामध्ये प्रथमतः पुरंदर प्रकल्पामध्ये प्रायोगिक तत्वावर 15 अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्गाची स्थाप­ना करणेत आलेली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे ग्राम बाल विकास केंद्गांची स्थापना करणेत आलेली आहे

अंगणवाडी इमारत बांधकामे

जिल्हा वार्षिक योजना सन 2009-10 अंतर्गत पुणे जिल्ह्यास 176.12 लक्ष अनुदान प्राप्त झाले होते. सन 2010-2011 अंतर्गत 1103.88 लक्ष अनुदान प्रति अंगणवाडी 4.00 लक्षप्रमाणे 401 अंगणवाडी केंद्गाना प्राप्त झाले आहे.

महिला तक्रार निवारण समिती

महाराष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विभाग यांचेकडील निर्णय दिनांक 19 सप्टेंबर 2006 अन्वये शासकीय/ निमशासकीय सेवेतील महिलोआ कर्मचा-यांच्या लैंगिक लैंगिक छळाबाब समस्यांची तपासणी करण्यासाठी महिला व तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे. महिला तक्रार निवारण समिती सर्व पंचायत समितीस्तरांवर कार्यरत आहेत. या समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

  1. सर्वोच्य आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कारासाठी निकष सन 2009-2010 अंगणवाडी कार्यकर्ती कामाचा तपशिल व मुल्यमापन

सन 200-10 आदर्श अंगणवाडी सेविका/मदतनिस पुरस्कार

सन 2010-2011 या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आदर्श कार्य असणा-या सेविका / मदतनिस यांना च्आदर्श अंगणवाडी सेविका/ मदतनिसछ पुरस्कारासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सन 2009-10 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या सेविका/ मदतनिसचा प्रस्ताव सादर केले आहेत. बाल विकास प्रकल्प अधिका-यांनी आपल्या प्रकल्पातून येणा-या प्रस्तावांची निकषाच्या आधारे व्यवस्थित छाननी करून प्रत्येक प्रकल्पातून एक अंगणवाडी सेविका व एक अंगणवाडी मदतनिसची शिफारस जिल्हा कक्षामध्ये केलेली आहे.

आदर्श अंगणवाडी मदतनिस पुरस्कारासाठी निकष सन 2009-2010 अंगणवाडी मदतनिस कामाचा तपशिल व मुल्यमापन

अर्जाचे नमुने